जगाला दाखवायला जरी सगळं वरवर ठीक असलं तरी मनाला झालेले घाव कधीच भरत नाही. ओठावर जरी हसू असलं तरी मनातलं कधीच ओठावर उमलत नाही.
आयुष्य चालतं राहतं, कारण श्वास थांबत नाही.
कोणीच जिंकत नाही ना, कुणाची हार होते.
पण मनातलं द्वंव कधीच संपत नाही. प्रत्येक श्वास हे द्वंव झुंजवत जातो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत.
मागे उरतो एक अनुत्तरित प्रश्न की, चूक कोणाची?
ज्याचं एक प्रश्नार्थक उत्तर असत “माझी कारण मला जगाचं ऐकायचं नाही?” नि दुसरं “का जगाची कारण त्याला काय पडलंय माझ्या आयुष्यात काय होणार आहे?”
जगाला कळत तरी असतील का मनातल्या वेदना? नि जग म्हणजे नक्की काय, नि असं कोणतं जग आहे ज्याला आपली पर्वा नाही.
जगाला धरून केलेल्या गोष्टी पण बऱ्याचदा चुकतातच ना?
जग काय म्हणेल, जगाला काय वाटेल, या सगळ्यात आपल्याला काय वाटतं, याचा विचार करतो तरी का आपण?
जग दोन्ही बाजूनी बोलतो, चांगल झालं तरीही नि वाईट झालं तरीही, जर आपण सकारात्मक विचार करून चांगलं होईल असा विचार केला नि जगाला काय वाटेल यापेक्षा आपल्याला काय वाटतं याचा विचार करून आयुष्यात पावलं टाकली तर आपलं आयुष्यावर नि त्याचं आपल्यावरच प्रेम जास्त दृढ होईल ना?
पण खरं सांगू हे वाचायला, ऐकायला खूप छान वाटत असलं तरी, प्रत्येक्षात असं काही घडत तरी का?
आपले आपले म्हणणारे जेंव्हा आपला सोडून जगाचा विचार करायला लागतात, आपल्या आनंदापेक्षा त्यांना जग काय म्हणेल हे महत्वाच वाटायला लागतं, तेंव्हा उरते ती “तडजोड”.
“स्वतः स्वतःशी केलेला एक अलिखित करार”, #तडजोड
प्रशांत
16/12/2017