उषःकाल (०१ जानेवारी २०२१)

०१ जानेवारी २०२१

एकदम दचकून जाग आली, काहीतरी भयानक घडलंय असं वाटतं होत. छाती वरखाली होत होती. मोबाईल उचलला न्यूज चॅनलची वेबसाईट ओपन केली, लेटेस्ट अपडेट, लेटेस्ट न्यूज सगळं चाळून झालं. पण अशी कोणतीच बातमी नव्हती की, जी भयानक असं काही घडलय हे स्पष्ट करेल.

थोडा धीर आला, स्वप्नच होत याची खात्री झाली. पण खर सांगू खुप भयाण स्वप्न होत.

जगात कुठे तरी, एका देशाच्या कोपऱ्यात जिथं प्राण्यांची खरेदी विक्री होते त्या ठिकाणी, कसला तरी वेगळाच व्हायरस निर्माण झालाय जो, आहे तरी अगदी सध्या सर्दी खोकाल्या सारखा पण खूप घातक आहे.
त्या व्हायरस ने बघता बघता यमराजाशी कारार केला.  खूप सारे लोक या आजाराला बळी पडत आहेत. मेडिकल सायन्स पण चाट पडलंय. आता काय करायचं? पुढे कसं होणार?
त्या देशाने त्या भागात पूर्णपणे  घराबाहेर पडण्यास बधी आणली.
ज्या लोकांना साधे सर्दी, खोकला, ताप असेल त्यांना घरातून ओढून ओढून हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं. कधी नव्हे तेवढ्या प्रचंड प्रमाणात लोकांना हॉस्पिटल्स मध्ये दाखल करण्यात येत होत.
त्या देशाने शरतीचे प्रयत्न करून नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.

पण जोपर्यंत या आजार विषयी जगाला कळाल, तो वर हा आजार हा हा म्हणता संपूर्ण जग भर पसरला. जगाच्या मेडिकल यंत्रणेच्या पेकडात एक जोरात लाथ बसली जणू.

काही देशात यम दुतांनी थैमान घातलं, इतकं की त्यांच्या गाडीत पण जागा नव्हती, इतक्या जणांचे प्राण घेऊन जायला. अगदी हाहाकार, भीती आणि विनाश.

देश ना देश बंद झाले. कुणी एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकत होत ना कुणी येऊ.
या देशातून त्या देश्याताच काय पण हळूहळू एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायला बंदी घातली गेली.
व्यापार उद्याग ठप्प झाले. लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आलं.
फक्त जीवनावश्यक गोष्टी पुरविल्या जाऊ लागल्या.

सगेसोयरे दूर झाले, कॉलेज, शाळा बंद. सुख आणि दुःख यावर देखील बंधन यावं. ना सुखाच्या क्षणात ना दुःखात नातलगांना साथ देता आली. स्वतःला वाचविण्याच्या प्रयत्न हा एकमेव उद्देश समोर राहिला.

त्यात आपल्या प्रसारमाध्यमांनी अर्थात मिडियाने या आजारच इतकं भांडवल केलं, की लोक आपल्या शिंका पण मोजायला लागले.
जणू आपण आता आज उद्यावर येऊन पोहचलो की काय अशी परिस्थिती या मिडिया ने सगळ्यांना पुढे उभी केली. एखादा आशेचा किरण जरी या मीडियाने दाखवला तर तो ही इतका निराशावादी पणाने की जणू “व्हायरस” संपला तर त यांचा धंदाच बुडेल. एवढी चांगली संधी कशी सोडेल हा मिडिया.

शक्य तितका कोपरा मिडियाने, चांगल्या गोष्टींना दाखवला. इतक्या जोमाने यांनी मृत्यू तांडव दाखवलं. की तेवढं त्या व्हारासलाही कधी नसतं जमल.
व्हायरस ने नसेल केलं, तेवढं या मीडियाने भीतीदायक वातावरण निर्माण केलं.

पण जसे हळूहळू जसजसे दिवस सरले, तसे मेडिकल फील्ड मध्ये अवल लोकांनी खुप सारे मार्ग उभे केले. लोकांचे प्राण वाचवण्यात काही प्रमाणात यश येऊ लागलं.

सुरुवातीला तर या व्हायरसच काय सुरू आहे, तेच समजत नव्हतं.
कित्येक लोक भीती पोटी याला शरण गेले. ते म्हणतात ना की, वेळ हे खूप चांगलं औषध आहे. जसं जसं लोकांना पटायला लागलं की हा आजार म्हणजे सर्दी, ताप, खोकल्याचा जरा लांबचा नातलग आहे, त्या नंतर सुरू झालं सत्र व्हायरसला नमवायच. आता लोकांच्या मनातली भीती कमी झाली होती. सर्वांना वास्तविक्ता समजून आली होती.
व्हायरसचा गोत्र मुरब्बा(बायोडाटा) जगाला कळला.

कोणत्याही लढाईची सुरुवात ही आपल्यापासून होते, हे स्वत:ला पटवून देत लोक परत नव्या उपाय योजनांचां अवलंब करत नव्याने जगायला लागले.

एकमेकांना साह्य करत साऱ्या जगाने यावर विजयच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली.

बघता बघता, तो दिवस आला जेंव्हा परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली. रुग्ण संख्या वाढत होती पण ठीक होणाऱ्यांची संख्या ही बरोबरीत येऊ लागली. चांगल्या लसीची निर्मिती झाली. लोकांना जगण्याची नवी उमेद, नवी दिशा मिळाली.

जग एकजुटीने लढा देत होत, आणि नियती त्याला यशही.

गजर वाजला, नि या भयाण स्वप्नातून जागा झालो. पण विश्वास बसत नव्हता, इतकं भयाण स्वप्न. सगळ्या बाजूने खात्री करून घेतली की हे स्वप्नच आहे. असं कधीच सत्य असू नये.

या कल्पनितेचा एवढाच निरागस हेतू आहे की, हे सत्य उद्याच्या भूतकाळाचा भाग बनून विरून जाईल. नि कधीच परत डोकं वर काढणार नाही.

– प्रशांत

#ManachaCanvas

२०/०७/२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *