मी कुणी कवी नाही.
मी कुणी कवी नाही
मी तर फक्त लिहितो.
माझ्या भावनांना शब्दांच
रूप फक्त देतो.
कोणी म्हणत त्याला कविता
कोणाच्या लेखी असतो वेडेपणा.
म्हणूनच तर म्हणतोय ना
मला कवी सोडून काहीही म्हणा.
‘विंदा’ सारखी चव माझ्या
कवितांना कधीच नसते.
ना असतो संदीपसारखा भावनिक ओलावा
ना सलील सारखी चाल असते.
मी तर लिहितो फक्त माझ्यासाठी.
म्हणून काय मी लगेच
कवी वगेरे ठरत नाही.
कारण कवींच्या यादीत
मी कणभरही उरत नाही.
– प्रशांत
#ManachaCanvas